वाढदिवस ‘किंगमेकरचा’, वाढदिवस समाजाप्रती संवेदना असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा
मॅनेजमेंट किंग रामदास विष्णू कळंबे

पोलादपूर, संदीप जाबडे
श्री. रामदास विष्णू कळंबे (संस्थापक : नरवीर ग्रुप ऑफ कंपनीस)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काही माणसं थेट पडद्यासमोर भूमिका मांडून समाजात ‘हिरो’ ठरत असतात तर काही व्यक्तिमत्व पडद्यामागून किंगमेकरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. उमरठ गावचे रामदास विष्णू कळंबे हे त्यापैकी एक.
उमरठ या आपल्या मातीतून अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे घडली, त्यापैकी एक तेजस्वी आणि प्रेरणादायी नाव म्हणजे रामदास कळंबे. साधेपणा, कर्तृत्व आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
पोलादपूर तालुका युवा संघटना ग्रामीण विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी युवकांना एकत्र आणून सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी घडवून आणली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवले गेले, ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली. युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण करणे, हे त्यांचे मोठे योगदान आहे.
नरवीर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्यांनी आपत्तीच्या काळात धावून जाऊन अनेकांचे प्राण वाचवले आहेत. संकटाच्या वेळी निःस्वार्थ भावनेने सेवा देणारा हा त्यांचा स्वभावच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक मोठेपणा देतो. समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात, हीच त्यांची खरी ओळख आहे.
उद्योजक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. व्यवसाय क्षेत्रात त्यांनी प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवले असून अनेकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या कार्यात सातत्य, चिकाटी आणि दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
मा. चंद्रकांतजी कळंबे साहेबांचे भाऊ आणि नामदार मंत्री भरतशेठ गोगावले साहेबांचे जवळचे विश्वासू म्हणून त्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या कार्यातून विश्वास, नातेसंबंध आणि समाजसेवा यांचा उत्तम संगम साधला आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना अभिमान वाटतो. त्यांनी समाजासाठी केलेले कार्य आणि पुढेही करत राहण्याची त्यांची जिद्द, ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राची कुळस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या चरणी प्रार्थना की, रामदासभाई कळंबे यांना उदंड, निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो, तसेच त्यांच्या हातून समाजसेवेचे असेच महान कार्य घडत राहो.

